ads

Breaking News

लडाखमध्ये भारताच्या रणगाड्यांची गर्जना; चिन्यांसह क्रूर हवामानाशी लढण्यास सज्ज

नवी दिल्लीः सीमेवरील तणाव मिटवण्यासाठी भारत आणि चिनी सैन्यांत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तरीही चीनच्या विरोधात कोणत्याही आघाडीवर लढण्यास सक्षम असल्याचं भारतीय लष्कराने आपल्या तयारीतून दाखवून दिलं आहे. डेमचोकमध्ये सिंधु नदीच्या किनाऱ्यावर हजारो मैल पसरलेल्या खोऱ्यात भारतीय लष्कराचे टी-९० आणि बीएमपी हे रणगाडे धडाडत आहेत. गरज भासल्यास हे रणगाडे काही मिनिटांत चीनच्या सीमेत घुसून घुसून त्यांची तळं उद्धवस्त करू शकतात. टी -९० भीष्म रणगाडे तैनात पूर्व लडाखमध्ये चीनशी झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने टी -९० भीष्म रणगाडे तैनात केले आहेत. अचूक निशाणा साधणारे जगातील सर्वोत्तम रणगाडे आहेत. या रणगाड्यांची तैनातीकरून भारतीय लष्कराने सर्वात मोठे शक्तिप्रदर्शन केल्याचे मानले जात आहे. भारतीय लष्कर युद्धसदृश परिस्थितीसाठी कोणत्याही क्षणासाठी सज्ज आहे, असा संदेश शत्रूला यातून गेला आहे. टी -९० ही भीष्म रणगाड्यांमध्ये क्षेपणास्त्र हल्ला रोखण्याचे कवच आहे. या रणगाड्यात १००० अश्वशक्ती इंजिन आहे. हे रणगाडे एका वेळी ५५० किमी अंतर कापण्यास सक्षम आहे. रणगाड्याचे वजन ४८ टन आहे. टी-९० भीष्म हा जगातील सर्वात हलक्या रणगाड्यांपैकी एक आहे. रात्रंदिवस शत्रूशी लढण्याची क्षमता त्यात आहे. अशा परिस्थितीत भारतीय सैन्याच्या रणगाड्यांची गर्जना चिन्यांना हादरवत आहे. फक्त वाळवंट आणि पाण्यातच नाही तर बीएमपी आता उंच डोंगराळ भागात देखील शत्रूचा सामना करण्यास पूर्णपणे तयार आहे. अँटी-टँक गाइडेड क्षेपणास्त्रांनी सुसज्ज बीएमपी कोणत्याही ठिकाणाला सहज लक्ष्य करू शकतो. लडाखमध्ये तैनात असलेले रणगाडे आणि बीएमपी चालविणाऱ्या जवानांमध्ये उत्साह आहे. भारतीय लष्कराने सर्व बाजूंनी आपली तयारी पूर्ण केली आहे. हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने रेशन, शस्त्रे, तेल आणि हिवाळ्यात रहाण्याची विशेष व्यवस्था केली जात आहे. हवामानही मोठा शत्रू फक्त चिनी सैन्याच नव्हे तर लडाखमध्ये कडाक्याचा हिवाळा हा देखील एक मोठा शत्रू आहे. लडाखच्या काही भागात हिमवृष्टीला सुरवात झाली आहे आणि आता तापमान उणे २० ते ४० अंशांपर्यंत खाली जाईल. अशा परिस्थितीत जवानांना तिथे राहण्यासाठी विशेष तंबू आणि प्रीफेब्रिकेटेड तंबू तयार करण्यात आले आहेत. या तंबूमध्ये राहण्याची, खाण्यासारख्या सर्व प्रकारच्या सुविधांची काळजी घेण्यात आली आहे. खासकरुन शून्यापेक्षा कमी तापमान असलेल्या या भागात जवान या तंबूंमध्ये आरामात राहू शकतात. चीनची चलाखी लक्षात घेता लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या सीमेवरील उंच शिखरांवर लष्कराने आपल्या तळांवर असे तंबू तयार करत आहेत. यासह जवानांसाठी आवश्यक असलेली शस्त्रे आणि साहित्य पाठवण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. चिन्यांची घुसखोरीची शक्यता आहे अशा प्रत्येक खोऱ्यात आणि शिखरांवर भारतीय लष्कराचे जवान तैनात आहेत. गलवानच्या रक्तरंजित संघर्षानंतर भारतीय लष्कर आता चीनच्या कुठल्याही कुरापतीला उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील मोक्याच्या शिखरांवर भारतीय लष्कराने ताबा मिळवला आहे. यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cB9xIX

No comments