ads

Breaking News

चक्कर येऊ लागल्यास ताबडतोब करा ‘हे’ उपाय, काही सेकंदातच डोकं होईल शांत!

चक्कर येणं किंवा अचानक डोकं गरगरु लागणं हा कोणताही गंभीर आजार नाही. तर हे एक शारीरिक कमजोरी असण्याचं लक्षण आहे. कधी कधीच चक्कर येणं एखाद्या आजाराचा संकेत देखील असू शकतं. जसं की एनीमिया, बीपी कमी होणं, हृदय कमजोर होणे, ब्रेन ट्यूमर किंवा अतिप्रमाणात ताण तणाव असणं. खरं तर आपण उन्हातून घरी आलो की आपलं डोकं जड होतं आणि आपल्याला चक्कर येऊ लागते. चक्कर आल्याने उत्साह राहत नाही, विचित्र आणि असहाय्य वाटू लागतं, काम करण्याची इच्छा होत नाही, धड झोपही लागत नाही आणि एनर्जी अचानक कमी झाल्यासारखी वाटू लागते. खरं तर चक्कर येणं हा गंभीर आजार जरी नसला तरी त्रासदायक समस्या आहे हे मात्र नक्की! अशा वेळी आपल्याला समजत नाही की नक्की कशामुळे आपल्याला असं होतंय? आणि या समस्येवर आराम मिळवण्यासाठी काय उपाय करावेत? कारण आराम हा जरी यावर पर्याय असला तरी हे औषध नक्कीच नाही. म्हणूनच मंडळी, तुम्हालाही कधी अचानक अशी चक्कर आली किंवा घराबाहेरुन आल्यावर असं होत असेल तर ताबडतोब घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीपासून तुम्ही हा त्रास छू मंतर करु शकता. जाणून घ्या कसा?

चक्कर येणं, डोकं गरगरणं यासारख्या समस्यांसाठी करा खाली दिलेले घरगुती उपाय!


चक्कर येऊ लागल्यास ताबडतोब करा ‘हे’ उपाय, काही सेकंदातच डोकं होईल शांत!

चक्कर येणं किंवा अचानक डोकं गरगरु लागणं हा कोणताही गंभीर आजार नाही. तर हे एक शारीरिक कमजोरी असण्याचं लक्षण आहे. कधी कधीच चक्कर येणं एखाद्या आजाराचा संकेत देखील असू शकतं. जसं की एनीमिया, बीपी कमी होणं, हृदय कमजोर होणे, ब्रेन ट्यूमर किंवा अतिप्रमाणात ताण तणाव असणं. खरं तर आपण उन्हातून घरी आलो की आपलं डोकं जड होतं आणि आपल्याला चक्कर येऊ लागते. चक्कर आल्याने उत्साह राहत नाही, विचित्र आणि असहाय्य वाटू लागतं, काम करण्याची इच्छा होत नाही, धड झोपही लागत नाही आणि एनर्जी अचानक कमी झाल्यासारखी वाटू लागते.

खरं तर चक्कर येणं हा गंभीर आजार जरी नसला तरी त्रासदायक समस्या आहे हे मात्र नक्की! अशा वेळी आपल्याला समजत नाही की नक्की कशामुळे आपल्याला असं होतंय? आणि या समस्येवर आराम मिळवण्यासाठी काय उपाय करावेत? कारण आराम हा जरी यावर पर्याय असला तरी हे औषध नक्कीच नाही. म्हणूनच मंडळी, तुम्हालाही कधी अचानक अशी चक्कर आली किंवा घराबाहेरुन आल्यावर असं होत असेल तर ताबडतोब घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीपासून तुम्ही हा त्रास छू मंतर करु शकता. जाणून घ्या कसा?



चक्कर येण्याची समस्या
चक्कर येण्याची समस्या

साधारणत: चक्कर येण्याची समस्या भेडसावताना व्यक्तीला जीव घाबरा घुबरा होणं, मळमळ होणं, शिट्टी वाजत असल्यासारखा आवाज कानात सतत घुमत राहणं अशा काही समस्या जाणवू लागतात. या दरम्यान काही लोकांना ऐकू येण्याचं बंद होतं किंवा कान जड झाल्यासारखे वाटू लागतात.

चक्कर येण्याच्या या समस्येला बिनाइनपैरॉक्सिस्मल पोजिशनल वर्टिगो (benign paroxysmal positional vertigo) असं म्हटलं जातं. ज्याला शॉट मध्ये BPPV असंही म्हटलं जातं. ही समस्या वयस्कर लोकांमध्ये आणि जास्त वय असणा-या लोकांमध्ये अधिक दिसून येते.

(वाचा :-

या २ कारणांमुळे कमजोर होतं आपलं हृदय, ‘या’ ५ फळांचे सेवन केल्यास दूर होईल धोका!

)



वेळेनुसार बरी होणारी समस्या
वेळेनुसार बरी होणारी समस्या

बहुतांश वेळा कमजोरी कमी होताच चक्कर येण्याची समस्या देखील दूर होते. पण जर तुम्हाला चक्कर कोणत्या औषधांचा साईड इफेक्ट, मेंदूशी निगडीत काही समस्या किंवा अन्य कोणत्या रोगामुळे येत असेल तर याचे निदान हे केवळ वैद्यकिय उपचारांनीच होऊ शकते.

(वाचा :-

Juice Vs Soup : ज्यूस व सूप यापैकी काय असतं अधिक लाभदायक? जाणून घ्या नाश्त्यात काय प्यावं?

)



धणे आणि आवळा
धणे आणि आवळा

आपल्या मसाल्यांतील एक उपयुक्त पदार्थ धणे (Coriander Seeds) जीव घाबरा घुबरा होण्याची समस्या दूर करण्यास, चक्कर कमी करण्यास आणि मळमळ दूर करण्यासाठी फार जुना उपाय आहे. हा शारीरिक कमजोरी दूर करण्यासोबतच चक्कर येण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्याचा एक सोपा मार्ग आहे.

यासाठी रात्री झोपताना एक चमचा धणे आणि सुका आवळा पाण्यामध्ये भिजत घाला. सकाळी हे पाणी गाळून त्याचं सेवन करा. शक्य असल्यास धणे आणि आवळा गुळासोबत चावून खा. यामुळे तुमचं पोट साफ राहिल आणि शरीर नैसर्गिकरित्या मजबूत राहिल. आवळा आणि धणे ब-याच आजारांना शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करतात.

(वाचा :-

घ्या जाणून पोटाच्या समस्यांवर उपाय काय?

)



आल्याचा चहा
आल्याचा चहा

चक्कर आल्यास किंवा डोकं गरगरु लागल्यास आल्याचा छोटासा तुकडा तोंडात ठेऊन चॉकलेटसारखा हळू हळू चघळू शकता. जर तुम्हाला कच्चं आलं खाण्यास काही त्रास होत असेल तर तुम्ही नियमित आल्याचा चहा पिऊ शकता.

आलं आपल्या शरीरातील रक्तप्रवाह वाढवण्याचं काम करतं. सोबतच आलं तुमचा मेंदू शांत ठेऊन त्यास संतुलित ठेवण्यास लाभदायक ठरतं. तसंच जीव घाबरा-घुबरा होणं व मळमळ किंवा उलटी होण्याच्या समस्येपासून सुटका देतं.

(वाचा :-

तुमचेही केस झपाट्याने सफेद होतायत? मग जाणून घ्या यामागील कारणे व साधेसोपे घरगुती उपाय!

)



पुदीन्याचा चहा
पुदीन्याचा चहा

डोकं गरगरणं आणि चक्कर येणं या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पुदीन्याचा चहा उत्तम पर्याय आहे. डोकं गरगरण्यासोबतच शांत होण्यास, मळमळ रोखण्यासही मदत मिळेल.

पुदीन्याचा चहा बनवण्यासाठी पुदीन्याची सुकलेली किंवा ताजी हिरवी पाने पाण्यात घालून मंद आचेवर पाणी उकळून घ्या. १० ते १५ मिनिटांनी हे पाणी गाळून चहासारखं प्या. यामुळे तुमच्या आरोग्यास अनेक लाभ होतील.

(वाचा :-

Make Eyes Beautiful : डोळ्यांच्या समस्यांनी त्रस्त आहात? मग ट्राय करा ‘हे’ ५ घरगुती उपाय!

)



हर्बल टी आणि काढा प्या
हर्बल टी आणि काढा प्या

१ हिरवी वेलची, १ लवंग, १ काळी मिरी, ४ तुळशीची पाने, दोन चिमटी चहापावडर घेऊन त्यात १ कप पाणी मिक्स करा व हे मिश्रण मंद आचेवर उकळवा. सामग्री उकळत असताना भांड्यावर झाकण ठेवा. जवळ जवळ १० मिनिटे सामग्री शिजवून घेतल्यानंतर स्वादानुसार त्यामध्ये साखर व २ ते ३ थेंब लिंबाचा रस पिळून घ्या. अशाप्रकारे आपली हर्बल टी तयार आहे. दिवसातून २ वेळा या चहाचे सेवन करा तुम्हाला लाभच लाभ मिळतील.

पण ६ ते ७ दिवस वर दिलेल्या उपायांपैकी एक उपाय करुन बघा. तरीही काहीच फरक दिसून येत नसेल तर मात्र तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण सतत चक्कर येण्यामागे एखादा आजरही असू शकतो किंवा शरीरात पोषक तत्वांची भरपूर कमी देखील असू शकते.

(वाचा :-

तुम्हाला जाणवतायत ‘ही’ ५ लक्षणं? मग समजून जा शरीरात झाली आहे पाण्याची कमतरता!

)





from Lifestyle Tips in Marathi, Tips for Healthy Lifestyle in Marathi, Health Tips & Latest Fashion Trend - जीवनशैली टिप्स, निरोगी जीवनशैली टिप्स, सौंदर्य टिप्स, लाइफस्टाइल टिप्स https://ift.tt/2I2MxHj

No comments