राहुल गांधींना हासरथला जाण्याची परवानगी मिळाली; ५ लोक नेऊ शकतात सोबत
नवी दिल्ली: पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी हासरथला रवाना झालेल्या राहुल गांधींना ५ लोकांसह हासरथला जाण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. मात्र या ५ लोकांना प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचे पालन करावे लागणार आहे. यात तोंडाला मास्क लावणे, आणि करोनाशी संबंधित इतर गोष्टींची काळजी घेणे अनिवार्य असणार आहे. या पूर्वी आणि काँग्रेसच्या ३५ खासदारांसह हासरथसाठी निघाले होते. मात्र त्यांना तो पर्यंत परवानगी मिळालेली नसल्याने ते हाथरसला पोहोचू शकतील का असा प्रश्न होता. मात्र मला कुणीही हाथरसला जाण्यापासून रोखू शकणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यामुळे पोलिस प्रशासन आणि सरकारवर मोठा दबाल आला. त्यानंतर राहुल गांधी यांना ५ लोकांसह हासरथला जाण्याची परवानगी देण्यात आली. डीएनडीवर पोहोचलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी नियमांचे आणि कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याची माहिती नोएडाचे पोलिस सहआयुक्त रणवीर सिंह यांनी दिली. तर दुसरीकडे काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या घराभोवती मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दिल्ली नोएडा डायरेक्टवर मोठ्या संख्येने पोलिस तैनात होते. शेकडो कार्यकर्ते जमा झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता. या वेळी काँग्रेसचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारविरोधात घोषणा देत होते. यामुळे डीएनडीवर वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली. या मुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना पांगण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. 'मुख्यमंत्री आदित्यनाथ डरपोक आहेत' दरम्यान, काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी हाथरस प्रकरणावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. योगी आदित्यनाथ हे डरपोक असून ते आता लपून बसले आहेत. भारतीय जनता पक्षाचे सरकार डरपोक आहे, मात्र भारतीय जनता पक्षाचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाही, असे सुरजेवाला म्हणाले. राहुल गांधी हे एकटेच हाथरसला जाऊ इच्छित होते. मात्र त्यांना जाऊ दिले गेले नाही, त्यांना धक्काबुक्की करून जमिनीवर पाडण्यात आले. आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत याचा आम्हाला अभिमान आहे, असे सांगत जे अनाचार करत आहेत, जे दोषी आहेत त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी करणे चुकीचे आहे का, असा सवालही सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. क्लिक करा आणि वाचा- हा काँग्रेस विरुद्ध भाजप असा विषय नाही हा काँग्रेस विरुद्ध भाजप असा विषय नाही. हा विषय आहे पीडित कुटुंबाला न्याय देण्याबाबतचा. पीडित कुटुंबावर दबाव टाकला जात आहे, असे म्हणत मिडियाला प्रवेशापासून का रोखले गेले. राहुल गांधी जर एकटे जाऊ इच्छित होते तर त्यांना का जाऊ दिले नाही, असे प्रश्न विचारत रणदीप सुरजेवाला यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर संशय व्यक्त केला आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30vxYCv
No comments