करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ८ लाखांनी कमी, दीड महिन्यात पहिल्यांदाच
नवी दिल्ली: देशात करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ८ लाखांनी कमी झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, भारतात एकूण ७ लाख ९५ हजार ८७ इतके आहेत. मागील दीड महिन्यांच्या कालावधीत सक्रिय रुग्णांची संख्या ८ लाखांहून कमी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ६२ हजार २११ नवे रुग्ण वाढले आहेत, तर एकूण ८३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या बरोबरच देशात रुग्णांची संख्या वाढून ती ७४ लाख ३२ हजार ६८० इतकी झाली आहे. शुक्रवारच्या ६३,३७१ नवे रुग्ण आणि ८९५ मृत्यूंचा विचार करता शनिवारचा तक्ता खाली घसरल्याचे दिसते. या व्यतिरिक्त भारतात रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी देखील वाढून तो ७०.४ दिन इतक्यावर आला आहे. या वरून दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येत घसरण होत असल्याचे स्पष्ट होत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ८८ टक्क्यांच्या आसपास आतापर्यंत ६५ लाख २४ हजार ५९५ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयान दिली आहे. तर एकूण १ लाख १२ हजार ९९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ८७.७८ टक्के इतका आहे, तर मृत्युदर १.५२ टक्के इतका आहे. देशात सर्वात अधिक करोनाग्रस्त राज्य असलेल्या महाराष्ट्रात एकूण १५ लाख ९६ हजार ६२ इतके रुग्ण आहेत. तर राज्यात ४१ हजार ५०२ मृत्यू झाले आहेत. यानंतर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्लीचे स्थान आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) आकडेवारीनुसार, देशात शुक्रवारी ९ लाख ९९ हजार ९० इतक्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. या बरोबरच आतापर्यंत एकूण ९ कोटी ३२ लाख ५४ हजार १७ नमुन्यांची चाचणी झाली आहे.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31dx264
No comments