हैदराबाद: मुसळधार पावसाने भिंत कोसळली; २ महिन्यांच्या बाळासह ९ जणांचा मृत्यू
हैदराबाद: (Andra Pradesh)आणि तेलंगणमध्ये (Telangana) गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पुढील २४ तासांत (Heavy Rainfall) कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आंध्र प्रदेश सरकारने पावसाचा फटका बसलेल्या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र लिहून सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तर, दुसरीकडे राजधानी हैदराबादमध्ये मुसळधार पावसाने भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत २ महिन्यांच्या मुलासह ९ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून बचावकार्य सुरू आहे. हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. मी बंडलागुडाच्या मोहम्मदीया हिल्स परिसरात पोहणीसाठी गेलो होतो, तेथे एक भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच २ जण जखमी झाले आहेत. मी शमशाबादमध्ये अडकलेल्या लोकांना मदत केली आता मी तलबकट्टा आणि येसराबनगरच्या मार्गाला आहे, अशी माहिती असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करत दिली आहे. दरम्यान, पूर्व गोदावरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बोम्मूर गावात घराचे छत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तेलंगणमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा निर्माण झालेला पट्टा मंगळवारी आंध्र प्रदेशाच्या पूर्व गोदावरी जिल्ह्याच्या काकीनाडाच्या किनारपट्टीवरून पुढे सरकला. याच कारणामुळे मुसळधार पाऊस होत आहे. हा दाबाचा पट्टा काल संध्याकाळी साडे सहा ते सकाळी साडे सात या कालावधीत किनारपट्टी भागातून पुढे सरकला असे राज्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले. पूर्व गोदावरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बोम्मूर गावात घराचे छत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. क्लिक करा आणि वाचा- आध्र प्रदेशचे मुख्य सचिव यांनी प्रभावित जिल्ह्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. सखल भागात पावसामुळे पाणी भरले असून पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊ शकते. झाडे कोसळू शकतात. वीजप्रवाहावर देखील परिणाम होऊ शकतो. हे पाहता छोट्या पुलांवर विशेष लक्ष दिले पाहिजे. ज्या भागांमध्ये धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता वाटते, अशा ठिकाणी वाहतूक आणि पदपथ ताबडतोब बंद करायला हवेत. मनुष्य हानी आणि मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे मुख्य सचिवांनी पत्रात लिहिले आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lKET2S
No comments