ads

Breaking News

आयुर्वेदिक काढ्याचा यकृतावर परिणाम होतो का?; आयुष मंत्रालयाने केले स्पष्ट

नवी दिल्ली: करोनाशी (Coronavirus) लढण्यासाठी देशातील असंख्य लोक घरगुती उपाय करू लागले आहेत. कोणी गरम वाफ घेते, तर कुणी गरम पाणी पिते तर कुणी आयुर्वेदिक काढाही (Ayurvedic Kadha) घेते. घेतल्याने शरीरातील () वाढते आणि परिणामी करोनाची लागण होण्याची शक्यता कमी होते असे म्हटले जाते. मात्र अनेकांच्या मनात आयुर्वेदिक काढ्याबाबत अनेक प्रकारच्या शंका देखील आहेत. दीर्घकाळ काढा घेतल्याने यकृताला नुकसान होते का असा प्रश्नही अनेकांच्या मनात आहे. मात्र, या दाव्याचे आयुष मंत्रालयाने खंडन केले आहे. (no evidence of by having ) आयुर्वेदिक काढा घेतल्याने माणसाच्या यकृताला नुकसान पोहोचते ही धारणा चुकीची आहे, असे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे. याचे कारण म्हणजे काढा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तू घरात जेवण बनवताना वापरल्या जातात, असे आयुष मंत्रालयाचे म्हणणे आहे. चा विचार करता आयुष मंत्रालयाने रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी काढ्याचे सेवन करण्याचा सल्ला आयुष मंत्रालयाने दिला आहे. दालचीन, तुळस आणि काळीमिरीचा उपयोग काढा बनवण्यासाठी केला जातो आणि त्याचा श्वसनयंत्रणेवर चांगला परिणाम होतो, असे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- मंत्रालयाने अन्य पदार्थांसोबत तुळस, दालचीन, काळीमिरी, सुंठ आणि मनुकांचा उपयोग करून काढा बनवण्याचा सल्ला दिला आहे. हा काढा दिवसातून दोन वेळा घेणे हितकारक असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. या काढ्यामुळे यकृताला नुकसान होते याचे कोणतेही पुरावे नाहीत, असे कोटेचा म्हणाले. या काढ्यात जेवढे पदार्थ वापरले जातात, ते सर्व पदार्थ घरात जेवणासाठी वापरले जातात याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. या काढ्याचा कोविड-१९ शी लढण्यासाठी किती उपयोग होतो, या वर संशोधन सुरू असल्याचेही ते म्हणाले. क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3d73snC

No comments