हाथरस पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षेत तैनात तीन पोलीस 'करोना पॉझिटिव्ह'!
नवी दिल्ली : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आलेले तीन पोलीस कर्मचारी आढळल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे संपूर्ण गावालाच 'कंन्टेन्मेंट झोन' म्हणून घोषित केलं जाण्याची शक्यता वाढलीय. सामूहिक बलात्कार पीडितेचा मृत्यू आणि तिच्या मृतदेहावर पोलिसांनीच कुटुंबीयांशिवाय मध्यरात्री उरकलेले अंत्यसंस्कार यामुळे गावकऱ्यांत रोष वाढलेला दिसून येतोय. त्यातच या प्रकरणात विरोधी पक्षांनीही तीव्र नाराजी व्यक्त केलीय. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आज हाथरसमध्ये पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी दाखल होणार असल्याचीही माहिती मिळतेय. अशा वेळी गावाला 'कन्टेन्मेंट झोन' घोषित करण्यात आलं तर बाहेरच्या व्यक्तींना गावात शिरण्याची परवानगी नाकारली जाऊ शकते. पत्रकारांना गावाबाहेरच रोखलं दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात नेमलेलं तीन सदस्यीय विशेष तपासणी पथक गावात दाखल झालंय. मीडियाला मात्र गावात जाण्याची परवानगी नाकारण्यात आलीय. गावापासून १.५ किलोमीटर अंतरावर पत्रकारांना रोखण्यात आलंय. वाचा : वाचा : हाथरसमध्ये कलम १४४ लागू हाथरस जिल्ह्याची सीमा सील केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय. संपूर्ण जिल्ह्यात (कलम १४४) लागू करण्यात आलीय. पाच हून अधिक जणांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली. पोलीस म्हणतात, बलात्काराचा पुरावा नाही पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीगढ रुग्णालयाच्या मेडिकल रिपोर्टमध्ये जखमांचा उल्लेख आहे. मात्र त्यामध्ये जबरदस्तीनं सेक्शुअल इंटरकोर्सचा (बलात्काराचा) उल्लेख नाही. तर 'फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी' (FSL) रिपोर्ट आल्यानंतर आपण याबद्दल माहिती देऊ शकू, असं डॉक्टरांनी म्हटलंय. वाचा : वाचा : अंत्यसंस्कार घाईघाईत का उरकले? हाथरस जिल्ह्यातील बूल गढी गावात १९ वर्षांच्या दलित तरुणीवर १४ सप्टेंबरला चौघांनी पाशवी बलात्कार केला होता. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मंगळवारी तिचा मृत्यू झाला. प्रचंड पोलीस बंदोबस्तात मुलीचा मृतदेह दिल्लीहून गावात आणण्यात आला, तेव्हा मुलीसोबत असलेले कुटुंबीय पोहोचलेही नव्हते. त्यानंतर, बुधवारी पहाटे अत्यंत घाईघाईत स्थानिक पोलिसांनी दमदाटी करून अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडल्याची तक्रार पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केली आहे. स्थानिक पोलिसांनी मात्र, या घटनेचा इन्कार केला असून, कुटुंबीयांच्या इच्छेनुसारच अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मध्यरात्रीच्या सुमारास बूल गढी गावातील लोक रस्त्यावर आले. काहींनी चंडपा पोलीस ठाण्याबाहेर, तर काहींनी हाथरस शहरात निदर्शनं केली. वाचा : वाचा :
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cQ5iJp
No comments