ads

Breaking News

दिल्लीहून हाथरसकडे निघालेल्या पत्रकारासोबत तीन जणांना अटक

लखनऊ : हाथरस कथित बलात्कार आणि पीडित मुलीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशातलं राजकारणही ढवळून निघालंय. राज्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसतंय. त्यामुळेच जिल्ह्यात दाखल होणाऱ्या वाहनांवरही सुरक्षा यंत्रणांची नजर आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी मथुरेत दिल्लीतून हाथरसला निघालेल्या एका पत्रकारासह चौघांना अटक केलीय. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही संदिग्ध व्यक्ती दिल्लीहून हाथरसकडे निघाले होते. टोल प्लाझावर संदिग्ध वाहनांची तपासणी सुरू असताना या चार तरुणांना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या संशयित हालचालींवरून त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकीशी करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांची नावं अतिक उर रहमान, सिद्दीकी, मसूद अहमद आणि आलम असं असल्याचं समजतंय. त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप आणि इतर संशयित साहित्य जप्त करण्यात आलंय. वाचा : वाचा : चौकशीमध्ये हे चौघे जण '' (PFI) आणि या संघटनेची सहकारी संघटना 'कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया'शी संबंधित आहेत. चार तरुणांपैंकी एक तरुण व्यावसायानं पत्रकार आहे. केरळ स्थित एका 'वेबसाईट'साठी तो काम करतो. 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'शी संबंध असल्याच्या कारणावरून त्याला याआधीही कायदेशीर नोटीस धाडण्यात आल्याचं समजतंय. दुसरीकडे, केरळच्या युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट असोसिएशनं अटक करण्यात आलेल्या पत्रकाराला सोडण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलंय. संबंधित पत्रकार हाथरसमध्ये सध्याच्या परिस्थितीवर वार्तांकन करण्यासाठी तिथे गेल्याचं पत्रकार संघटनेनं आपल्या पत्रात म्हटलंय. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारकडून 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' या संघटनेवर बंदी आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात आंदोलनानंतर 'पीएफआय'वर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर, उत्तर प्रदेश सरकारला या संघटनेवर बंदी आणायचीय. वाचा : वाचा :


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2I2b7bx

No comments