ads

Breaking News

तुम्हाला जाणवतायत ‘ही’ ५ लक्षणं? मग समजून जा शरीरात झाली आहे पाण्याची कमतरता!

पाणी (water) म्हणजे जीवन हे आपण शाळेपासून शिकत आलो आहोत आणि ते अगदीच खरं आहे. पाणी म्हणजे आपल्या शरीरासाठी सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक होय. आपण एकवेळ अन्न न खाताना जास्त दिवस जगू शकतो, पण पाण्याशिवाय फारच कमी दिवसात आपला अंत होईल, म्हणून म्हणतात ना पाणी हे मनुष्यासाठी जीवन आहे. आपलं शरीर हे जवळपास ७० टक्के पाण्याने तयार झालेलं आहे. आपण हे केवळ आपल्याला जिवंत ठेवत नाही तर आपल्या शरीराला क्रियाशील राखण्यासही मदत करते. उन्हाळ्यात बऱ्याचदा असं होतं की आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. यालाच वैद्यकीय भाषेत डिहाइड्रेशन (dehydration) असं म्हणतात. डिहाइड्रेशन झालं की आपल्याला खूप समस्या सुरु होतात. शारीरिक त्रास सुरु होतो आणि जर वेळीच पाणी मिळालं नाही तर मात्र जीव सुद्धा जाऊ शकतो. आज आपण याच डिहाइड्रेशनची काही सामान्य लक्षणे पाहूया जी आपल्याला सांगत असतात की शरीराला आता पाण्याची गरज आहे.

शरीरातील पाण्याची पातळी ढासळण्याच्या समस्येला अनेक लोक हलक्यात घेतात पण आमची तुम्हाला विनंती आहे की असं मुळीच करु नका. कारण ही समस्या तुम्हाला अनेक प्रकारच्या गंभीर आजारांच्या विळख्यात ढकलू शकते.


तुम्हाला जाणवतायत ‘ही’ ५ लक्षणं? मग समजून जा शरीरात झाली आहे पाण्याची कमतरता!

पाणी (water) म्हणजे जीवन हे आपण शाळेपासून शिकत आलो आहोत आणि ते अगदीच खरं आहे. पाणी म्हणजे आपल्या शरीरासाठी सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक होय. आपण एकवेळ अन्न न खाताना जास्त दिवस जगू शकतो, पण पाण्याशिवाय फारच कमी दिवसात आपला अंत होईल, म्हणून म्हणतात ना पाणी हे मनुष्यासाठी जीवन आहे. आपलं शरीर हे जवळपास ७० टक्के पाण्याने तयार झालेलं आहे. आपण हे केवळ आपल्याला जिवंत ठेवत नाही तर आपल्या शरीराला क्रियाशील राखण्यासही मदत करते.

उन्हाळ्यात बऱ्याचदा असं होतं की आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. यालाच वैद्यकीय भाषेत डिहाइड्रेशन (dehydration) असं म्हणतात. डिहाइड्रेशन झालं की आपल्याला खूप समस्या सुरु होतात. शारीरिक त्रास सुरु होतो आणि जर वेळीच पाणी मिळालं नाही तर मात्र जीव सुद्धा जाऊ शकतो. आज आपण याच डिहाइड्रेशनची काही सामान्य लक्षणे पाहूया जी आपल्याला सांगत असतात की शरीराला आता पाण्याची गरज आहे.



शरीरातील उर्जा अचानक कमी होणे
शरीरातील उर्जा अचानक कमी होणे

शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यावर दिसणारं अजून एक महत्त्वपूर्ण लक्षण म्हणजे व्यक्तीला खूप थकवा जाणवतो. आपल्या अंगात ताकद नसल्याची जाणीव त्याला होते. हे यामुळे कारण शरीराला उत्स्फूर्त ठेवणाऱ्या पाण्याचा स्तर कमी झालेला असतो. थोडीशी मेहनत केल्यावरही व्यक्तीला लगेच थकवा जाणवतो. याव्यतिरिक्त पाण्याच्या कमतरतेमुळे बऱ्याचदा शरीरात कमी रक्तदाबाची समस्या निर्माण होते. ज्याचा परिणाम शरीरावर होऊन डोकं दुखू लागतं, चक्कर येते. हि सगळी लक्षणे दिसू लागल्यावर वेळीच पाणी प्यावे जेणेकरून शरीर पूर्ववत होईल.

(वाचा :-

या २ कारणांमुळे कमजोर होतं आपलं हृदय, ‘या’ ५ फळांचे सेवन केल्यास दूर होईल धोका!

)



युरीनशी संबंधित लक्षणे
युरीनशी संबंधित लक्षणे

शरीरात पाण्याची कमतरता झाली कि हमखास दिसणारे पहिले लक्षण म्हणजे युरीन अर्थात मुत्र. युरीनचा रंग जेव्हा पातळ आणि पाणी सारखा होतो, तेव्हा समजून जावं कि तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. पण जर याच युरीनचा रंग फिकट पिवळ्यावरून गडद पिवळा झाला तर मात्र हे डिहाइड्रेशनचे लक्षण समजावे. डिहाइड्रेशन झाल्याचं अजून एक लक्षण हे सुद्धा असतं की पिवळी लघवी सुरु झाल्यावर तुम्हाला जळजळ होत असल्याची जाणीव होते आणि जोरात खाज सुद्धा येते. डिहाइड्रेशन झाल्यावर युरीनचे प्रमाण सुद्धा कमी होते. अशावेळेस लवकरात लवकर शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढणे गरजेचे असते.

(वाचा :-

सांधेदुखीने त्रस्त आहात? मग आजच ट्राय करा ‘हा’ घरगुती उपाय!

)



पोटात भूक उसळणे
पोटात भूक उसळणे

शरीरात पाण्याची कमी निर्माण झाल्यास तहान लागणे तर साहजिक आहे पण भूक का लागत असावी या प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? चला त्याचं उत्तर पण जाणून घेऊया. याबद्दल अनेक संशोधने करण्यात आली पण त्यातून काही ठोस निष्कर्ष पुढे आला नाही. पण हे सिद्ध झालं की शरीरात पाण्याची कमतरता असल्यास पोट रिकामी राहते आणि भूक अधिक लागते. डिहाइड्रेशनच्या स्थितीत व्यक्तीला पाणी प्यायल्यानंतर लगेच पुन्हा तहान लागते. या स्थितीपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर तुम्ही साधं पाणी पिण्याऐवजी लिंबूपाणी, जलजीरा किंवा इलेक्ट्रोल सारखी एनर्जी देणारी पेय प्यावीत. यामुळे शरीराला लगेच आराम मिळतो आणि सारखी सारखी तहान सुद्धा लागत नाही.

(वाचा :-

Fiber Rich Fruits : 'या' फळांचा करा नियमित डायटमध्ये समावेश, वजन व ओटीपोटावरील चरबीसाठी आहेत लाभदायक!

)



मनावर भार निर्माण होणे
मनावर भार निर्माण होणे

कधी कधी डिहाइड्रेशनचा परिणाम थेट हृदयावर सुद्धा होतो. यामुळे व्यक्तीच्या हृदयाचे ठोके वाढतात. मन घाबरंघुबरं होतं. मनावर मोठा भार आहे असा भास होतो आणि श्वासोच्छवास जोरजोरात सुरु होतो. शरीरात पाण्याची कमी असल्यास रक्त प्रवाहावर सुद्धा विपरीत परिणाम होतो. यामुळे सर्व भागांपर्यंत रक्त वेळेत पोहचू शकत नाही आणि हृदयाला पंपिंग करताना जास्त जोर लावावा लागतो. म्हणून अश्यावेळी हृदयाला आणि जीवाला मोठा धोका निर्माण होतो.

(वाचा :-

पोटाचा घेर कमी करण्यासाठी साध्यासोप्या टिप्स!

)



तोंडातील लाळ कमी होणे
तोंडातील लाळ कमी होणे

शरीरात पाणी कमी होण्याच्या स्थितीमध्ये व्यक्तीचे तोंड व गळा कोरडा होतो. चेहऱ्याची त्वचा सुद्धा रखरखीत होते. याशिवाय तोंडातून दुर्गंधी सुद्धा येऊ लागते. हे यामुळे होतं कारण कोरडेपणामुळे तोंडात त्यात होणाऱ्या लाळीचे प्रमाण कमी होते. यामुळे तोंडात मोठ्या प्रमाणात विषाणू वाढीस लागतात जे तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीला कारणीभूत ठरतात. हि लक्षणे दिसल्यासही शरीरात पाण्याची कमतरता भासू लागल्याचे समजावे आणि वेळीच पाण्याची पर्याप्त मात्रा शरीराला द्यावी.

(वाचा :-

बॉलीवूडमध्ये का आहे ड्रग्सचं इतकं वेड? ड्रग्स शरीरावर नेमका काय परिणाम करतात?

)





from Lifestyle Tips in Marathi, Tips for Healthy Lifestyle in Marathi, Health Tips & Latest Fashion Trend - जीवनशैली टिप्स, निरोगी जीवनशैली टिप्स, सौंदर्य टिप्स, लाइफस्टाइल टिप्स https://ift.tt/33nqLGx

No comments