'देशातील गरीब उपाशी आहे, कारण...'; राहुल गांधींचा हल्लाबोल
नवी दिल्ली: विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर सतत हल्लाबोल करणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष (Rahul Gandhi) यांनी ग्लोबल इंडेक्स हंगर-२०२० (Global Hunger Index) मधील भारताच्या स्थितीवरून केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भूकबळींच्या प्रकरणी जगातील १०७ देशांपैकी भारत ९४ व्या स्थानी आहे. केंद्र सरकारने आपल्या काही खास मित्रांचे खिसे भरल्याने ही स्थिती उद्भवली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी लावला आहे. ( criticizes ) राहुल गांधी शनिवारी आपल्या ट्विटर हँडलवर भारताची स्थिती दाखवणारे एक ट्विट केले. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,'भारतातील गरीब उपाशी आहे, कारण सरकार फक्त काही खास मित्रांचे खिसे भरण्याच्या कामी लागले आहे.' आणि कुपोषणाचा विचार करता भारत आपल्याहून छोटे असलेले शेजारी देश नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानपेक्षाही मागासलेला आहे. १०७ देशांच्या या यादीत भारत ९४ व्या स्थानी आहे. या अहवालानुसार, भारतीतील भूकबळीची स्थिती गंभीर आहे. ग्लोबल इंडेक्स हंगरमध्ये वर्ष २०१४ मध्ये भारत ५५ व्या स्थानी होता. तर सन २०१९ मध्ये भारत १०२ ऱ्या स्थानी आला होता. तथापि, यादीत नोंद करण्यात आलेल्या देशांची नावे दरवर्षी वाढताना दिसत आहेत. सन २०१४ मध्ये भारत ७६ देशांच्या यादीत ५५ व्या पायरीवर होता. सन २०१७ मध्ये तयार झालेल्या ११९ देशांच्या यादीत भारत १०० व्या, तर सन २०१८ च्या ११९ देशांच्या यादीत भारत १०३ व्या स्थानी होता. क्लिक करा आणि वाचा- जीडीपीत झालेल्या घसरणीवरूनही केला होता हल्लाबोल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारतातील घसरती अर्थव्यवस्था आणि सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) झालेली मोठी घसरण या मुद्द्यांवरून देखील मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. या मुद्द्यावर आतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाच्या-IMF) अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालात या वित्तीय वर्षात भारताच्या विकासात १० टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शिवाय, भारताचा विकासदर बांगलादेशच्या विकासदराहून कमी राहणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37bnDzX
No comments