पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन? गृहमंत्री अमित शहा म्हणतात...
नवी दिल्ली : देशात करोना परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली दिसत आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू, संचारबंदी यांसारखे अनेक निर्बंध लागू केले असले तरी परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचं दिसून येतंय. अशावेळी पुन्हा एकदा संबंधी चर्चांणा उधाण आलंय. मात्र, केंद्रीय अमित शहा यांनी पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊनच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. करोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्बंधांबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आता राज्यांच्या हातात देण्यात आला आहे. सर्व राज्यांतील सरकार आपापल्या हिशोबानं निर्णय घेत आहेत, असं गृहमंत्री यांनी स्पष्ट केलंय. गेल्या तीन महिन्यांपासून निर्बंधाचे अधिकारी आम्ही राज्यांना सोपवले आहेत. कारण प्रत्येक राज्यातील करोना परिस्थिती एकसमान नाही. त्यामुळे राज्य सरकारनं आपापल्या ठिकाणची परिस्थिती ध्यानात घेऊन निर्णय घेणं अपेक्षित आहे, असं अमित शहा यांनी म्हटलंय. देशात सुरुवातीला लॉकडाऊन जाहीर झाला तेव्हा खूपच कमी होत्या. बेड, चाचणी सुविधा, यांसारख्या अनेक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हत्या. आता मात्र केंद्र आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे तयारी करण्यात आलीय. यापुढील निर्बंधाचे निर्णय राज्यांनी आपापल्या परिस्थितीनुसार घ्यावेत, केंद्र सरकार त्यांना पूर्ण सहकार्य करणार असंही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. कुंभमेळ्याबद्दलही अमित शहा यांनी भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात स्वत: संतांना आवाहन केलं आहे. कुंभ प्रतिकात्मक पद्धतीनं करण्याचा पर्याय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संतांसमोर ठेवला आहे. १३ पैंकी जवळपास १२ आखाड्यांनी आपल्यावतीनं कुंभ समाप्त करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे इथली गर्दीही कमी होत आहे, असं अमित शहांनी म्हटलंय. ज्या राज्यांत कुंभ किंवा निवडणुका नाहीत अशा राज्यांचे आकडे तेजीनं वाढताना दिसून येत आहेत, असंही गृहमंत्र्यांनी नमूद केलंय. परदेशातून येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे, अशा राज्यांत करोना संक्रमण अधिक असल्याचं अमित शहांनी म्हटलंय.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RATSTh
No comments