मध्य प्रदेशात ऑक्सिजन अभावी १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप, नातेवाईकांनी टाहो फोडलाा
भोपाळः मध्य प्रदेशातील शहडोलमध्ये धक्कादायक घटना घडली ( ) आहे. अनेक हॉस्पिटल्सना ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना ( ) करावा लागतोय. ऑक्सिजनची कमतरता दूर झाल्याचा दावा शिवराज सिंह चौहान सरकार करत आहे. पण मध्य प्रदेशातील शहडोलमधील घटनेने सरकारचा दावा फोल ठरला आहे. शहडोलच्या जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन अभावी करोनाच्या १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला आहे. शहडोलमध्ये करोना व्हायरसचा संसर्ग वेगाने पसरत आहे. रोज १०० हून अधिक करोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच गेल्या २४ तासांत ऑक्सिजन अभावी १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात ६ रुग्णांचा मृत्यू हा रात्री उशिरा झाला. ऑक्सिजन सिलिंडर संपल्याने मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा नव्हता तर ऑक्सिजनचे प्रेशर कमी झाले होते, अस मेडिकल कॉलेजच्या डीनने म्हटले आहे. आयसीयूमध्येही अनेक रुग्ण आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा असता तर आणखी मृत्यू झाले असते. ऑक्टिजनचा तुटवडा आहे. पण उपलब्ध ऑक्सिजनच्या माध्यमातून रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन दिला जात आहे, असा दावा डीन यांनी केला. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला. या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीर अपर जिल्हाधिकारी अर्पित वर्मा हे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. ऑक्सिजन प्रेशरच्या कमतरतेमुळे १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं ते म्हणाले. तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी या घटनेवरून मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे. ऑक्सिजन अभावी आता शहडोलमध्ये रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. भोपाळ, इंदूर, उज्जैन, सागर, जबलपूर, खंडवा, खरगोनमध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू होऊनही सरकार जागं झालं नाही? कधीपर्यंत ऑक्सिजन अभावी होणारे मृत्यू कधी थांबतील? असा सवाल कमलनाथ यांनी केला आहे.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32m7sfs
No comments