ads

Breaking News

करोना संक्रमित पत्नीसाठी बेड मिळवण्याची 'लढाई', हतबल BSF जवानाचा बांध फुटला!

रीवा, : करोना संक्रमणानं देशाला घट्ट विळखा घातलेला असातनाच मध्य प्रदेशात हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आलीय. सीमेवर देशवासियांसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या जवानांपैंकीच एक जवान आपल्या पत्नीचा जीव वाचवण्यासाठी लाचार झालेला पाहून अनेक जणांना धक्का बसलाय. शत्रुला बंदुकीच्या तोडीसतोड प्रत्यूत्तर देणारा हा जवान आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी हतबल झाल्यानंतर अश्रू भरल्या डोळ्यांनी रुग्णालयात बेड मिळण्यासाठी धडपड करत राहिला. अश्रू आवरणंही कठीण जिल्ह्यातून हा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक गाडीतून आपल्या आजारी पत्नीला घेऊन जाताना दिसत आहे. पत्नी असल्याचं समोर आल्यानंतर तिला रुग्णालयात बेड मिळण्यासाठी पतीची धडपड सुरू असल्याचं या व्हिडिओतून लक्षात येतंय. पत्रकारांशी बोलताना आपली व्यथा सांगताना शत्रुसमोर पहाडासारखं उभ्या राहणाऱ्या या जवानाला मात्र आपले अश्रू आवरणंही कठीण झालं. आठ तासांची भटकंती 'गेल्या आठ तासांपासून मी पत्नीला घेऊन वेगवेगळी रुग्णालय गाठत आहे. एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठवलं जात आहे. पत्नीला कोणत्या रुग्णालयात दाखल करता येईल, हे मात्र कुणीही निश्चितपणे सांगू शकत नाही' असं या जवानानं म्हटलं. तसंच मदतीसाठी त्यानं आवाहन केलं. त्यानंतर पत्रकारांच्या मदतीनं जवानानं आपल्या आजारी पत्नीला रीवाच्या संजय गांधी रुग्णालयात दाखल केलं. 'मी देशासाठी मरतो पण...' आपल्या कुटुंबासाठी काहीच करू शकत नसल्याचं लक्षात आल्यानंतर स्वत:च्या परिस्थितीवर बोलताना जवान हळवा झाला. 'मी देशासाठी मरतो. पण आजारी पत्नीला घेऊन मला फिरावं लागतंय. कुठे आणि कसे उपचार करू?' अशी हतबलता जवानानं माध्यमांसमोर व्यक्त केली. संबंधित बीएसएफ जवान त्रिपुरामध्ये तैनात आहे. चार दिवसांपूर्वीच सुट्टी घेऊन तो आपल्या घरी आला आहे. जवानानं करोना लस घेतलीय. परंतु, घरी आल्यानंतर पत्नी आजारी असल्याचं त्यांना समजलं. चाचणी केल्यानंतर पत्नी करोना संक्रमित असल्याचं समोर आलं. मंगळवारी सकाळपासूनच पत्नीला दाखल करण्यासाठी जवाना रुग्णालयाच्या फेऱ्या मारत होता परंतु, त्यांना तब्बल आठ तास कोणतीही मदत उपलब्ध झाली नाही. मध्य प्रदेशातली आकडेवारी आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशात गेल्या २४ तासांत १२ हजार ७२७ रुग्ण आढळल्यानंतर एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ४ लाख ३३ हजार ७०४ वर पोहचलीय. राज्यात सध्या ७८ हजार २७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर तब्बल ४ हजार ७१३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QJwDWV

No comments