ads

Breaking News

ऑल इज नॉट वेल : भाजप नेत्यांकडून योगी आदित्यनाथांच्या दाव्यांची पोलखोल

करोना संक्रमणासारख्या कठीण प्रसंगात सरकारकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर 'विरोधकांनी टीका' ही साहजिकच गोष्ट मानली गेली परंतु, अशीच टीका सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनच केली गेली तर... मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात हेच घडताना दिसून येतंय! भाजपचे अनेक खासदार आणि आमदार मुख्यमंत्री आणि प्रशासनाला पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त करत आहेत. हे पत्रं सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. उत्तर प्रदेश भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचंच यातून समोर येतंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात बेड, ऑक्सिजन किंवा मेडिकल सुविधांची कोणतीही आणि कुठेही वाणवा जाणवत नसल्याचा दावा केला आहे. मात्र भाजपच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या दाव्याच्या अगदी विरुद्ध माहिती जारी केली जात आहे.

Coronavirus in Uttar Pradesh : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात बेड, ऑक्सिजन किंवा मेडिकल सुविधांची कमतरता नसल्याचा योगी आदित्यनाथ यांच्या दाव्यांची भाजपच्या अनेक नेत्यांनीच पोलखोल केलीय.


ऑल इज नॉट वेल : भाजप नेत्यांकडून योगी आदित्यनाथांच्या दाव्यांची पोलखोल

करोना संक्रमणासारख्या कठीण प्रसंगात सरकारकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर 'विरोधकांनी टीका' ही साहजिकच गोष्ट मानली गेली परंतु, अशीच टीका सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनच केली गेली तर... मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात हेच घडताना दिसून येतंय! भाजपचे अनेक खासदार आणि आमदार मुख्यमंत्री आणि प्रशासनाला पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त करत आहेत. हे पत्रं सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. उत्तर प्रदेश भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचंच यातून समोर येतंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात बेड, ऑक्सिजन किंवा मेडिकल सुविधांची कोणतीही आणि कुठेही वाणवा जाणवत नसल्याचा दावा केला आहे. मात्र भाजपच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या दाव्याच्या अगदी विरुद्ध माहिती जारी केली जात आहे.



'​आमदार असून हतबल'
'​आमदार असून हतबल'

गुरुवारी लखीमपूर खीरीच्या गोला मतदारसंघाचे भाजप आमदार अरविंद गिरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्र लिहिलं होतं. आपल्या २४ हून अधिक सहकाऱ्यांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्यानं झाल्याचं गिरी यांनी या पत्रात उल्लेख केला होता. आपल्या मतदारसंघात बेड आणि आरोग्य व्यवस्था वाढवण्याची मागणी त्यांनी या पत्रातून केली होती.

'लोक ऑक्सिजनसाठी रडत आहेत आणि आमदार असूनही त्यांची मी मदत करू शकत नाही. मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करत राहिलो परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही', अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली.

राज्याचे मुख्यमंत्री परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत परंतु, प्रशासनाच्या योग्य प्रयत्नांअभावी सर्व वाया जात असल्याचंही म्हणत त्यांनी अपयशाचं खापर जिल्हा प्रशासनावर फोडलं.



​कायदेमंत्र्यांनीही लिहिलं पत्र
​कायदेमंत्र्यांनीही लिहिलं पत्र

कायदेमंत्री बृजेश पाठक हे राज्य सरकारला पत्र लिहिणारे पहिले निर्वाचित सदस्य होते. त्यांनी आपल्या पत्रात लखनऊ प्रशासनच्या फोलपणावर बोट ठेवलं होतं. बेड, ऑक्सिजन आणि योग्य उपचार न मिळाल्यानं लोकांना प्राण गमवावे लागत असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं.



​पंचायत निवडणुकी दरम्यान ७०० शिक्षकांचा मृत्यू
​पंचायत निवडणुकी दरम्यान ७०० शिक्षकांचा मृत्यू

मोहनलालगंजचे भाजप खासदार कौशल किशोर यांनीही अनेकदा परिस्थितीबद्दल प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय. खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याचं सांगत त्यांनी सरकारी रुग्णालयांत स्वत: लक्ष घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. कौशल किशोल यांनी निवडणूक आयोगाला उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली होती. परंतु, त्याचा परिणाम झाला नाही. उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकीत ड्युटीवर असणाऱ्या ७०० हून अधिक शिक्षकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.



​मेरठच्या खासदारांचं पत्र
​मेरठच्या खासदारांचं पत्र

मेरठचे खासदार राजेंद्र अग्रवाल यांनीही मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल पत्रं लिहून कळवलं होतं. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत असल्याचनं रुग्णालयत रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी नकार देत आहेत आणि रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत, असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं.



​आमदार दीनानाथ भास्कर यांचा आरोप
​आमदार दीनानाथ भास्कर यांचा आरोप

या आठवड्याच्या सुरुवातीला औराई, भदोहीचे भाजप आमदार दीनानाथ भास्कर यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. भदोहीच्या भाजप जिल्हा सचिवांची कोविड संबंधीत मृत्यूच्या चौकशीची मागणी त्यांनी केली होती. भाजप जिल्हा सचिव लाल बहादूर मौर्या यांचा २७ एप्रिल रोजी भदोहीच्या एका सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला होता. रेमडेसिविर इंजेक्शन द्यायला नकार देतानाच डॉक्टरनं 'तुम्हीच भाजप सरकार बनवलंय. त्यामुळे तुमचा उपचार योगी, जिल्हाधिकारी आणि मुख्य आरोग्य अधिकारी येऊन स्वत: करतील' अशी भाषा वापरल्याचा आरोपही दीनानाथ भास्कर यांनी तक्रार केलीय.





from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eF7apO

No comments