धक्कादायक! १० लाखांची खंडणी घेतल्यानंतरही बड्या नेत्याची हत्या
पूर्णिया: बिहारमधील येथे लोक जनशक्ती पक्षाच्या (एलजेपी) नेत्याचे २९ एप्रिल रोजी झाले होते. त्यांचा मृतदेह काल, रविवारी सकाळी एका गावाजवळ आढळला. नेत्याच्या हत्येची माहिती मिळताच, कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांनी मृतदेह चौकात ठेवून संताप व्यक्त केला. १० लाख रुपये खंडणी घेतल्यानंतर ही हत्या करण्यात आली. पोलिसांचे हे मोठे अपयश आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. पूर्णिया येथून लोक जनशक्ती पक्षाचे नेते अनिल उरांव यांचे २९ एप्रिल रोजी अपहरण करण्यात आले होते. या अपहरणानंतर अनिल यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका करून अनिल यांना घेऊन येणार असल्याचे आश्वासन पोलिसांनी कुटुंबीयांना दिले होते. मात्र, रविवारी सकाळी कृत्यानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डंगराहा गावाजवळ अनिल यांचा मृतदेह आढळला. पोलिसांना माहिती मिळताच, ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. शवविच्छेदनानंतर नेत्याचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. त्यानंतर संतापलेल्या कुटुंबीयांनी मृतदेह आरएन साहू चौकात ठेवला. तेथे तीव्र संताप व्यक्त केला. आरोपींना १० लाखांची खंडणी दिली होती. तरीही अनिल उरांव यांची हत्या केली, हे पोलिसांचे अपयश आहे, असा आरोप कुटुंबीयांनी केला. उरांव हे बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आणि समर्थकांनी पूर्णिया शहरात आंदोलन केले होते. पूर्णियामध्ये उरांव हे खूपच सक्रिय होते. येथील मनिहारी विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवत होते.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2PLr5ek
No comments