ads

Breaking News

coronavirus : दिलासा! देशात सलग तिसऱ्या दिवशी करोना रुग्णांच्या संख्येत घट

नवी दिल्लीः देशातील करोना स्थितीबाबत दोन चांगल्या बातम्या आणि एक वाईट ( ) बातमी आहे. देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या ही २ कोटींच्यावर गेली आहे, ही वाईट बातमी आहे. देशात आतापर्यंत २ कोटी २ लाख ७५ हजारांहून अधिक नागरिकांना करोना संसर्ग झाला आहे. आता चांगली बातमी. भारतात एका दिवसात विक्रमी ३.१८ लाख नागरिक करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जगात कुठेच एकावेळी इतक्या संख्येत नागरिक बरे झालेले नाहीत. दुसरी चागंली बातमी. सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी करोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३ लाख ५५ हजार ६८० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ३० एप्रिलनंतर करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. गेल्या आठवड्यात शुक्रवारी ३० एप्रिलला एका दिवसात ४.२ लाख नवीन रुग्ण आढळून आले होते. यानंतर शनिवारी ३.९२ लाख आणि रविवारी ३.७० लाख नवीन रुग्ण आढळले होते. दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रातील करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहेत. पण देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या अजूनही आव्हानात्मक आहे. एका आठवड्यात ४१ टक्के मृत्यू, जगात सर्वाधिक संख्या देशात सोमवारी ३४३६ रुग्णांचा मृत्यू झाला. सोमवारी सलग ६ व्या दिववशी ३ हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. संपूर्ण आठवड्यात मृतांची संख्या ही ४१ टक्क्यांची वाढली. यादरम्यान २४ हजार ५०३ नागरिकांचा मृत्यू झाला. राजधानी दिल्लीत तर प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला एका मृत्युची नोंद होतेय. दिल्लीत सोमवारी ४४८ नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला. जगातील टॉप १० देशात भारताव्यतिरिक्त तुर्की, अर्जेंटिना, जर्मनी आणि कोलंबियात मृतांच्या संख्येत वाढ दिसून आली.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2PMuIRf

No comments