RBI गव्हर्नरांची तातडीची परिषद; कर्जांबाबत होऊ शकते ही मोठी घोषणा
मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांचा आलेख दिवसागणिक वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. गेल्या काही दिवसांतील करोनाचा कहर, टाळेबंदी आणि बेरोजगारी या घडामोडी पाहता रिझर्व्ह बँकेकडून कर्जदारांना तात्पुरता दिलासा देणारी मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेली महिनाभर देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड हानी केली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख तीन लाख रुग्णांवर गेला आहे. काही राज्यांनी दोन आठवड्यांचा कडक लाॅकडाउन लागू केला आहे. तर देश पुन्हा एकदा कठोर टाळेबंदीच्या उंबरठ्यावर आहे. तसे झाल्यास रिझर्व्ह बॅंकेकडून देखील कर्जदारांच्या दृष्टिने मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. नेक राज्यांनी करोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन आणि मिनी लॉकडाउन लागू केले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा करोनाचे संकट भीषण आहे. त्यामुळे लोन मोरॅटोरियमसारख्या उपयायोजनांची आवश्यकता आहे. बँकांवरील थकीत कर्जे आणि किरकोळ कर्जदारांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेने ईएमआय मोरॅटोरियमसारखा निर्णय घेण्याची शिफारस काही बँकांनी केली आहे. गेल्या वर्षी करोना संकटाने कोंडीत सापडललेया कर्जदारांना रिझर्व्ह बँकेने दिलासा दिला होता. अर्थ मंत्रालयाच्या निर्देशांनुसार रिझर्व्ह बँकेने बँकांना कर्ज वसुली स्थगित करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाचा कोट्यवधी कर्जदारांना फायदा झाला होता. यामुळे आताही तशा प्रकारे कर्जदारांना दिलासा देणारा निर्णय आरबीआयकडून घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3gYzt5n
No comments