ads

Breaking News

'या' राज्यांत करोनाची दुसरी लाट; सणासुदीच्या-थंडीच्या दिवसांत काळजी घ्या!

नवी दिल्ली : देशात आजपासून (Unlock-5 Guidelines) गाईडलाईन्स लागू करण्यात आल्या आहेत. सिनेगृह ५० टक्के क्षमतेसोबत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, केरळ आणि पंजाबमध्ये करोना संक्रमित रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक ठरलीय. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, करोना व्हायरसच्या अनेकांसाठी जीवघेणी ठरू शकते. त्यातच सणासुदीचे दिवस तोंडावर आल्यानं चिंतेच्या परिस्थितीत आणखीनच वाढ होऊ शकते. थंडीच्या दिवसांत स्वत:ची आणि आपल्या कुटुंबीयांची अधिक काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. जुलै महिन्यात पहिली लाट राजधानी दिल्ली, केरळमध्ये कोविड १९ संक्रमित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालीय. दिल्लीत करोनाची पहिली लाट जूनमध्ये पाहायला मिळाली होती. इथं दररोज जवळपास ३००० रुग्णांची भर पडत होती. जुलैच्या सुरुवातीला आणि शेवटी दररोजची संख्या घटताना दिसली. या दरम्यान राजधानी दिल्लीत दररोज जवळपास १००० रुग्णांची भर पडत होती, असं आकडेवारीवरून दिसून येतंय. संक्रमणाची दुसरी लाट? दिल्लीत ९ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी तब्बल ४०३९ रुग्ण आढळल्यानं प्रशासनालाही धक्का बसला होता. दिल्लीत आत्तापर्यंत एकूण संक्रमितांची संख्या अडीच लाखांच्या पुढे गेलीय. बुधवारी दिल्लीत ३८२७ नवीन रुग्ण आढळलेत. यानंतर नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी धोक्याचा इशारा दिलाय. 'दिल्ली, पंजाब आणि केरळमध्ये संक्रमणाची दुसरी लाट पाहू शकतोय' असं पॉल यांनी म्हटलंय. वाचा : वाचा : केरळमध्येही चिंताजनक स्थिती केरळमध्येही करोना संक्रमितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येतेय. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या आकड्यात थोडी घट दिसून आली होती. परंतु, १६-२२ सप्टेंबर दरम्यान इथं पुन्हा संक्रमितांची संख्या वाढली. २३-२९ सप्टेंबरच्या आठवड्यात राज्यात ५८९८ नवीन रुग्ण आढळले. पंजाबच्या पाच शहरांनी दिला धक्का पंजाबमध्ये मंगळवारपर्यंत कोविड १० चे १६८२४ नवीन रुग्ण आढळलेत. राज्यातील पाच शहरांत लुधियाना, जालंधर, मोहाली, अमृतसर आणि पटियाला यांत सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आलीय. तर राज्यात ३३५९ करोना मृत्यू नोंदवण्यात आलेत तर एकूण रुग्णांची संख्या १,१२,४६० वर पोहचलीय. थंडीच्या दिवसांत अधिक काळजी घ्या! पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया (PHFI) चे अध्यक्ष के श्रीनाथ रेड्डी यांनी दुर्गापूजा, छठ, दिवाळी यांसारखे सण साजरे करताना मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिलाय. सणांच्या दिवसांत या क्षणांचा आनंद साजरा करतानाच काळजी घेण्याचीही अधिक गरज आहे. अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात आपण पोहचलो असलो तरी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. तसंच थंडीच्या दिवसांचीही सुरुवात होतेय. अशावेळी श्वसनाशी संबंधीत आजारांत आपसूकच वाढ दिसून येते. यंदा मात्र करोना धोक्यामुळे सतर्क राहणं गरजेचं असल्याचं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलंय. इतर बातम्या : वाचा : वाचा :


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2GskeRL

No comments