ads

Breaking News

हाथरस गँगरेप : राहुल-प्रियांका गांधी घेणार पीडित कुटुंबीयांची भेट

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या हाथरस सामूहिक घटने प्रकरणी देशभरातून प्रतिक्रिया उमटल्यात. लखनऊसहीत अनेक जिल्ह्यांत बुधवारी अनेक लोक या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले. या घटनेविरुद्ध राजकीय वर्तुळातूनही अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. गुरुवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि हाथरसला जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडे, या प्रकरणाच्या तपासणीसाठी उत्तर प्रदेश सरकारकडून गठीत करण्यात आलेली विशेष तपासणी पथक (SIT) हाथरसमध्ये दाखल झालंय. वाचा : वाचा : हाथरस प्रकरण पेटलेलं असतानाच उत्तर प्रदेशच्या बलरामपूर जिल्ह्यातही आणखी अशीच एक धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलंय. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी यावरून उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर हल्लाबोल केलाय. 'हाथरसप्रमाणेच बलरामपूरमध्येही एक बिभत्स घटना घडली. बलात्कारानंतर मुलीचे पाय आणि कंबर तोडण्यात आले. आझमगढ, बागपत, बुलंदशहरात मुलींसोबत या घटना घडल्यात. उत्तर प्रदेशात पसरलेल्या जंगलराजची हद्दच आता संपलीय. मार्केटिंग आणि भाषणांनी कायदेव्यवस्था चालत नाही. हे मुख्यमंत्र्यांचं उत्तरदायित्व आहे. जनतेला उत्तर हवंय' असं ट्विट प्रियांका गांधी यांनी गुरुवारी या प्रकरणात केलंय. वाचा : वाचा भीम आर्मी प्रमुख पोलिसांच्या ताब्यात? सामूहिक बलात्कारानंतर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झालेल्या दलित तरुणीच्या कुटुंबीयांसोबत हाथरसकडे निघालेले भीम आर्मीप्रमुख चंद्रशेखर आझाद आणि या संघटनेच्या दिल्ली युनिटचा प्रमुख हिमांशू वाल्मिकी यांना पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतल्याचा आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे अलिगडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलंय. आझाद आणि वाल्मिकी मंगळवार, रात्री १० वाजल्यापासून बेपत्ता आहेत. ते बलात्कारपीडित दलित तरुणीच्या कुटुंबीयांसोबत हाथरसकडे निघाले होते, अशी माहिती आझादने मार्चमध्ये स्थापन केलेल्या आझाद समाज पक्षाच्या कार्यकर्त्याने दिली. वाचा : वाचा :


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33iyq9e

No comments