ads

Breaking News

फोटोफीचर: देशी करोना लस केव्हा येणार?, भारत बायोटेकने सांगितले

जून २०२१ पर्यंत Covaxin या देशी लशीच्या नियामक मंजुरीसाठी भारत बायोटेक आता अर्ज करणार आहे. देशात Covaxin या देशी लशीची चाचणी सुरू असून या चाचणीद्वारे डेटा गोळा करण्यासाठी कमीतकमी सहा महिन्यांचा कालावधी लागेल असा अंदाज भारत बायोटेकने व्यक्त आहे. Covaxin या देशी लशीच्या आतापर्यंत १-२ टप्प्यातील चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. या लशीची लवकरच तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू होणार आहे. २६ हजारांहून अधिक स्वयसेवकांवर या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यात येणार असल्याचे भारत बायोटेकने सांगितले आहे. भारत बायोटेक या कंपनीने Covaxin च्या निर्मितीसाठी आतापर्यंत ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यातील बराचसा पैसा हा लशीच्या चाचणीवर खर्च केला जात आहे, अशी माहिती भारत बायोटेकने दिली आहे.

Covaxin launch date: येत्या २०२१ पर्यंत करोना लशीला मंजुरी मिळू शकेल असे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. भारत बायोटेक व्यतिरिक्त भारतात Serum Institute of India आणि ydus Cadila च्या लशींची चाचणी सुरू आहे.


फोटोफीचर: देशी करोना लस केव्हा येणार?, भारत बायोटेकने सांगितले

जून २०२१ पर्यंत Covaxin या देशी लशीच्या नियामक मंजुरीसाठी भारत बायोटेक आता अर्ज करणार आहे. देशात Covaxin या देशी लशीची चाचणी सुरू असून या चाचणीद्वारे डेटा गोळा करण्यासाठी कमीतकमी सहा महिन्यांचा कालावधी लागेल असा अंदाज भारत बायोटेकने व्यक्त आहे. Covaxin या देशी लशीच्या आतापर्यंत १-२ टप्प्यातील चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. या लशीची लवकरच तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू होणार आहे. २६ हजारांहून अधिक स्वयसेवकांवर या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यात येणार असल्याचे भारत बायोटेकने सांगितले आहे. भारत बायोटेक या कंपनीने Covaxin च्या निर्मितीसाठी आतापर्यंत ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यातील बराचसा पैसा हा लशीच्या चाचणीवर खर्च केला जात आहे, अशी माहिती भारत बायोटेकने दिली आहे.



तातडीची मंजुरी देणे हे सरकारच्या हाती
तातडीची मंजुरी देणे हे सरकारच्या हाती

Covaxin या लशीला मंजुरी देणे हे आमच्या हातात नसल्याचे भारत बायोटेकचे कार्यकारी संचालक साई प्रसाद यांनी सांगितले. जो डेटा आमच्याकडे आहे तोच डेटा भारताच्या ड्रग कंट्रोलर्सकडे आहे. भारत सरकार केव्हाही या लशीला मंजुरी देऊ शकते, असेही साई प्रसाद म्हणाले. जर गरज भासली तर काही कंपन्या थेट लस खरेदी करू शकतात असे संकेत देखील सरकारे दिले आहेत. मात्र लशीला मंजुरी देणे हे केंद्र सरकारच्याच हातात आहे, असे साई प्रसाद म्हणाले.



Covaxin सुरक्षित आहे आहे, हेच पाहण्यासाठी चाचणी
Covaxin सुरक्षित आहे आहे, हेच पाहण्यासाठी चाचणी

भारतासारख्या मोठ्या देशामध्ये कोणत्याही लशीची मोठी चाचणी घेणे आवश्यक आहे, असे भारत बायोटेक कंपनीचे कार्यकारी संचालक साई प्रसाद यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्या तसेच करत असल्याचे के म्हणाले. आमच्यासाठी लशीची सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचेही ते म्हणाले. जर भारत बायोटेकने या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्याची वाट पाहत आहे आणि याबाबतची अंतीम मंजुरी पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत मिळू शकते, अशी माहिती साई प्रसाद यांनी दिली.



दुसऱ्या प्रकारच्या करोना विषाणूवरही Covaxin प्रभावी
दुसऱ्या प्रकारच्या करोना विषाणूवरही Covaxin प्रभावी

भारत बायोटेकच्या म्हणण्यानुसार, Covaxin चा सुरुवातीचा डेटा अतिशय चांगला आहे. या लशीपासून तयार होणाऱ्या अँटीबॉडीज SARS-COV-2 व्यतिरिक्त इतर करोना विषाणूंपासून देखील रक्षा करण्यासाठी सक्षम आहे किंवा नाही याची तपासणी देखील भारत बायोटेक करत आहे. हे तपासण्यासाठी कंपनीने सुरुवातीचे नमूने पुण्याच्या नॅशनल इन्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) या संस्थेके पाठवले आहेत. या तपासणीचा निकाल अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यानंतर भारत बायोटेक आणखी एक यशाचा टप्पा गाठणार आहे.



लशीच्या मंजुरीबाबत स्थिती स्पष्ट नाही
लशीच्या मंजुरीबाबत स्थिती स्पष्ट नाही

जगभरात करोना विषाणूचा कहर सुरूच असून लस निर्मितीची स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. जगभरातील काही कंपन्या २०२० हे वर्ष संपेपर्यंत आपली लस लॉन्च करू शकतील, असे संकेत भारत बायोटेक कंपनीने दिले आहेत. मात्र, भारतात पहिल्या करोना लशीला केव्हा मंजुरी मिळेल याबाबत अजूनही स्पष्टता नाही. सन २०२१ पर्यंत लशीला मंजुरी मिळेल असे काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले होते.



करोनाची देशातील अशी आहे स्थिती!
करोनाची देशातील अशी आहे स्थिती!

दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ४५ हजार १४९ नवे रुग्ण वाढल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर, २४ तासांत ४८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या बरोबर देशात एकूण करोबाधितांची संख्या ७९,०९,९६० वर पोहोचली आहे. तसेच, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ६,५३,७१७ असून आतापर्यंत एकूण ७१,३७,२२९ रुग्ण बरे झाले आहेत. करोनाच्या महासाथीने आतापर्यंत एकूण १,१९,०१४ इतके बळी घेतले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सोमवारी सकाळी दिली.





from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31HLgwC

No comments