ads

Breaking News

अमेरिका निवडणुकीपूर्वीच भारत-अमेरिका संरक्षण करार होणार?

नवी दिल्ली : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ () आणि संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर (Mark T Espar) '' मंत्रीस्तरीय चर्चेसाठी (Ministerial Talks) सोमवारी भारतात दाखल होत आहेत. भारत चीन तणाव तसंच अमेरिकेत होणार्‍या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या एका आठवड्यापूर्वी चर्चेची ही तिसरी फेरी पार पडतेय. मंगळवारी ही 'टू प्लस टू' चर्चा होणार आहे. चर्चेत भारताकडून परराष्ट्रमंत्री एस जयशंकर () आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह () सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात पार पडणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच भारत आणि अमेरिका यांच्यात काही महत्त्वपूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जातेय. एक अग्रगण्य स्थानिक आणि जागतिक ताकद म्हणून नव्यानं ओळखल्या जाणाऱ्या भारताचं स्वागत करत आहोत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या पुढच्या कार्यकाळात आपल्या दृढ सहयोगाबद्दल अमेरिका आशावादी आहे, असं अमेरिकन परराष्ट्र विभागाकडून अधिकृतरित्या म्हटलं गेलंय. वाचा : वाचा : 'माझा भारत, श्रीलंका, मालदीव आणि इंडोनेशियाचा प्रवास सुरू झाला आहे. स्वतंत्र, बळकट आणि संपन्न राष्ट्रांनी बनवलेल्या मुक्त आणि खुल्या भारत पॅसिफिकसाठी सामायिक दृष्टिकोनासाठी आमच्या सहकाऱ्यांशी जोडल्या जाण्याच्या संधीबद्दल आभारी आहे' असं माई पोम्पिओ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या भारत आणि चीन सीमावादावरून निर्माण झालेल्या तणावादरम्यान ही भेट आणि चर्चा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं सांगण्यात येतंय. या चर्चेदरम्यान संरक्षण क्षेत्रातील काही महत्त्वपूर्ण करार होऊ शकतात. 'टू प्लस टू' चर्चेदरम्यान दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांदरम्यान रणनीतीविषयक चर्चा पार पडतेय. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्कटी एस्पर दिल्लीत होणार्‍या संमेलनात सहभागी होण्यासाठी भारताकडे रवाना झाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीनंतर आठ महिन्यांनंतर ही चर्चा होत आहे. वाचा : वाचा :


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mnMx3w

No comments