#Unite2FightCorona पंतप्रधान म्हणतात, 'औषध नाही तोपर्यंत निष्काळजीपणा नाही'
नवी दिल्ली : आणि भाजपकडून यांनी आगामी सणासुदीचे तसंच थंडीचे दिवस ध्यानात घेऊन करोनाविरुद्ध बचावासाठी एका 'जन आंदोलना'ची सुरूवात करण्यात आलीय. ढासळत्या अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता भारतासारख्या विशाल लोकसंख्येच्या देशासाठी हे महत्त्वाचं पाऊल आहे. जन आंदोलनाची सुरुवात करताना 'औषध नाही तोपर्यंत निष्काळजीपणा नाही' असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. 'या, करोनाशी एकजूट होऊन लढू, नेहमी लक्षात ठेवा : मास्क नक्की वापरा, हात साफ करत राहा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, दोन गज की दूरी (सहा फुटांचं अंतर) ठेवा' असं म्हणताना पंतप्रधानांनी असा हॅशटॅग वापरलाय. 'कोविड १९ विरुद्ध भारताची लढाई जनतेद्वारे लढली जातेय. आपल्या कोविड योद्ध्यांना या लढाईनं मोठी ताकद मिळतेय. आपल्या सामूहिक प्रयत्नांनी अनेक लोकांचा जीव वाचलाय. ही लढाई आपल्याला पुढेही सुरूच ठेवावी लागेल आणि आपल्या नागरिकांना व्हायरसपासून वाचवावं लागेल' असंही पंतप्रधानांनी म्हटलंय. रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करताना म्हटलंय, 'स्वत: सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित राहण्यासाठी मदत करा आणि करोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हा' उत्तर प्रदेशचे यांनीही करोनाविरुद्ध पुढे नेण्याचं आवाहन जनतेला केलंय. उल्लेखनीय म्हणजे, देशात ६७.५७ लाखांहून अधिक करोना संक्रमित रुग्ण आढळलेत. यातील तब्बल ५७,४४,६९३ रुग्णांनी करोनावर मात केलीय. तर ९,०७,८८३ रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत या आजारानं १,०४,५५५ रुग्णांचे प्राण घेतलेत.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36HKouZ
No comments