करोनाकाळात 'कुंभा'नं हैराण झालेल्या उत्तराखंड सरकारनं चार धाम यात्रा केली रद्द!
नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये भरलेल्या नंतर आता करोना संक्रमणाचा प्रभाव चार धाम यात्रेवरही दिसून येतोय. करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची रद्द करण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारनं घेतलाय. मंदिराचे दरवाजे वेळेवर उघडले जाणार आहेत परंतु, इथे केवळ पूजा करण्यासाठी पुजाऱ्यांनाच प्रवेशाची परवानगी असेल. करोना संक्रमणकाळात चार धाम यात्रेसाठी भाविकांना परवानगी देणं शक्य होणार नाही, असं मुख्यमंत्री यांनी म्हटलंय. यंदा, पुढच्या महिन्यात म्हणजेच १४ मे रोजी यमुनोत्री मंदिराचे कपाट उघडतानाच चार धाम यात्रेला सुरुवात होणार होती. परंतु, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे भाविकांच्या आपल्या उत्साहावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. गेल्या वर्षीही करोना संक्रमण तेजीत असताना उत्तराखंड सरकारकडून चार धाम यात्रा रोखण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्य सरकारनं जुलैपूर्वी भाविकांसाठी चार धाम यात्रेला परवानगी दिली होती. या दरम्यान, करोना संक्रमण रोखण्यासाठी भाविकांना अनेक निर्बंध पाळण्याची सक्तीही करण्यात आली होती. परंतु, यावर्षी मात्र चार धाम यात्रा रद्द करण्यात आलीय. चार धाम यात्रेमुळे उत्तराखंडच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होते. परंतु ही यात्रा रद्द झाल्यानं व्यावसायिक मात्र चिंतीत आहेत. याअगोदर, कुंभमेळ्या दरम्यान करोनाचा विस्फोट झाल्यानंतरही कुंभ आवरता घेण्यास राज्य सरकारनं नकार दिला होता. त्यानंतर कुंभमेळ्याला परवानगी देणाऱ्या उत्तराखंड सरकारवर देशभरातूनच नाही तर जगभरातून मोठी टीका झाली होती. त्यामुळे फजिती टाळण्यासाठी राज्य सरकारनं चार धाम यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SdZx27
No comments