करोनाविरोधी लढ्याला महाराष्ट्र काँग्रेसचे बळ; घेतला मोठा निर्णय
मुंबई: करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं आरोग्याच्या क्षेत्रात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासमोर मोठं आर्थिक संकट उभं ठाकलं आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारला आधार महाराष्ट्र काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षानं मुख्यमंत्री सहाय्याता निधीमध्ये ५ लाखांचे योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, काँग्रेसचे मंत्री व आमदार आपले एक वर्षाचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. (Maharashtra Decides to Contribute To CM Fund) वाचा: करोनाची महामारी सुरू झाल्यानंतर मागील मार्च महिन्यापासून राज्यात लॉकडाऊनची स्थिती आहे. ऑक्टोबरनंतर लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आला होता. मात्र, अर्थचक्र रुळावर आले नव्हते. आर्थिक घडी बसवण्याचे प्रयत्न होत असतानाच करोनाची दुसरी लाट आली आणि राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला. त्यामुळं पुन्हा एकदा अर्थचक्र थांबले आहे. त्याचा थेट परिणाम राज्याच्या महसुली उत्पन्नावर झाला आहे. एकीकडे आरोग्यावर मोठा खर्च होत असताना उत्पन्न घटल्यानं सरकारपुढंही आव्हान उभं राहिलं आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन काँग्रेसनं आर्थिक योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा: काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते, महसूलमंत्री यांनी ही माहिती दिली आहे. त्यानुसार, काँग्रेस बाळासाहेब थोरात हे स्वत: मोफत लसीकरणासाठी आपले एक वर्षांचे मानधन देणार आहे. सहकारी संस्थांच्या पाच हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च यातून केला जाणार आहे. त्याशिवाय, काँग्रेस मंत्री व आमदार एका वर्षाचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटीने स्वतंत्रपणे पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nwY0j7
No comments