ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या गाड्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबईः अन्य राज्यातून येणाऱ्या ऑक्सिजनचा साठा विथाअडथळा विविध शहरात पोहोचावा यासाठी सरकारने करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा दिला असून या वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. करोना संकटात औषधांसह ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला अन्य राज्यातून ऑक्सिजन उपलब्ध करून दिला आहे. मात्र, यात वाहतूक आणि प्रवासाला लागणार वेळ ही मुख्य समस्या आहे. यासाठीच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परराज्यातून येणारी तसंच राज्यांतर्गंत ऑक्सिजन वाहन गाड्यांची वेगवान वाहतूक होऊन सर्वसामान्यांना वेळेत ऑक्सिजन मिळावा यासाठी सरकारने ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या गृह विभागानं काढले आहेत. यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या गाड्यांचा टोल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, वाढत्या करोनारुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे. अन्य राज्यांतून कमी वेळेत जास्त प्रमाणात ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ तयार करून रेल्वेरुळांवरून ऑक्सिजन आणला जाणार आहे. राज्यातील रेल्वे प्रशासनाने याबाबतीत तातडीने पावले उचलली असून कळंबोली येथील मालधक्क्यावरून रविवारी रेल्वेरुळांवरून टँकरची ने-आण केली जाणार आहे ऑक्सिजनसाठी ग्रीन कॉरिडॉर ऑक्सिजन टँकरसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात येणार असल्याची तसेच, या टँकरच्या वाहतुकीसाठी परिवहन विभागातील चालकांची मदत घेणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी सोमवारी दिली होती. या ग्रीन कॉरिडॉरमुळे ऑक्सिजनचे टँकर कोणत्याही अडथळ्याशिवाय इच्छितस्थळी लवकर पोहोचतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3v3D8T9
No comments