फडणवीसांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार; ट्वीट करत म्हणाले...
मुंबईः राज्यातील करोना रुग्णांची दिवसागणिक वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळं आरोग्य प्रशासनावरील ताण वाढत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा, कोविड सेंटरमधील बेड या सारखी अनेक संकट राज्यावर आली आहेत. राज्यातील करोना परिस्थीती हाताळण्यासाठी राज्यानं केंद्राकडे मदतीचा हात मागितला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यावरुन राजकारण रंगलं आहे. आता केंद्रानं राज्याला सर्वाधिक पुरवठा केल्याचा दावा विरोधी पक्षनेते यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी यांचे आभार मानले आहेत. तसंच, महाराष्ट्रातील नागरिकांना सर्वाधिक मदत केल्याचंही त्यांनी या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. केंद्रानं राज्यांना केलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा हा महाराष्ट्राला करण्यात आला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील नागरिकांना सर्वाधिक मदतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेकाअनेक आभार. महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन, जो की गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश यांच्यासह कोणत्याही प्रमुख राज्याशी तुलना केली तर जवळजवळ दुप्पटीहून अधिक आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींचे 'मन की बात' देशातील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं स्थिती बिकट होत चालली आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. करोनाविरोधी लढाई जिंकण्यासाठी लस महत्त्वाची आहे. लसीकरण महत्त्वाचं आहे. पण लसीबाबत नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. केंद्र सरकारकडून राज्यांना लसीचा मोफत पुरवठा केला जात आहे. करोनाच्या या संकटात केंद्र सरकार राज्यांना मदत करण्यासाठी आपल्या सर्व शक्तींचा उपयोग करत आहे, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xmfFP8
No comments